शत्रूचा नायनाट

समजा, तुम्ही एका अत्यंत कडव्या शत्रूशी लढत आहात. तुम्हा दोघांच्या सैन्यांमध्ये कधीही तह वगैरे आजिबात संभवत नाही. तू किंवा मी आणि विजय किंवा मरण असे द्वंद्वयुद्ध. अशा वेळी लढाईत तुम्ही वरचढ चढलात आणि तुमचा तो शत्रू आपल्या उरल्यासुरल्या सैन्यासह, कुटुंबियांसह तुम्हाला शरण आला तर तुम्ही काय कराल?

Situation आणखी clear करण्यासाठी आपण असे म्हणूया की तुमच्या आणि त्या शत्रूच्या value system मध्ये काहीही middle ground नाहीये. (असं कधी नसतं पण मध्ये बराच काळ गेला की अशी परिस्थिती येऊ शकते.) तुमच्या histories, संस्कृती, आणि भविष्याच्या visions अत्यंत वेगवेगळ्या – विरुद्ध – आहेत, असं तुम्हा दोघांनाही जाणवलं आहे. त्यामुळे एकतर तुमचं किंवा त्याचं अस्तित्व असणं शक्य आहे. दोघे एका वेळी गुण्या आणि गोविंदासारखे राहणे शक्यच नाही. अशा वेळी तो तुमच्या तावडीत सापडला तर तुम्ही काय कराल?

आणखी ब‑याच complications टाळण्यासाठी असं समजा की हा शत्रू एखादा देश वगैरे नसून एक माणूस आहे. आणि तो काही सैनिक आणि आईवडिल मुलबाळं यांच्यासह तुम्हाला शरण आला आहे.

थोडा विचार केला तर आपल्या असं लक्षात तो शरण येणं किंवा तावडीत सापडणं यामुळे अशा वेळी काही फरक नाही. तो किंवा तुम्ही अशा द्वंद्वात तुम्ही, कसेका होईना, वरचढ ठरलांत तर तुम्ही त्याला मारण्यापलीकडे काही पर्याय नसतो.

प्रभाकर आणि त्याच्या संघटनेचा तिथल्या लष्कराने शेवटी नायनाट केला. (त्याचे तेच नाव बरोबर आहे. उद्या तुम्ही मला ह्रूत्विक या नावाचा अपभ्रंशित वापर केल्याने एखादा हिरो हिट झाला असे सांगितले तरी मी ते मान्य थोडेच करणार आहे? अशी नावे कधी असतात तरी का! असो.)

आता इथे युद्धात चांगली आणि वाईट अशा बाजू असतात का असा विचार बाजूला ठेवू. कारण मला त्यांच्या ideologies बद्दल माहितीही नाही आणि उगीच comments करायची इच्छाही नाही. तो गेला तेव्हा २५ हून अधिक वर्षे चालवलेला लढा तो हरला असे म्हणूया. (अर्थात त्याचे success चे निष्कर्ष वेगळे असतील. उदा.- माझ्या माणसांना मान मिळवून दिला, वगैरे वगैरे.)

आपल्या वंशाच्या लोकांसाठी चालवलेल्या लढ्यात तिथल्या लष्कराला त्याने बराच काळ त्रस्त करून सोडले होते. त्याने आत्मघातकी बॉम्बहल्ले पहिल्यांदा सुरू केले. हल्ल्यांमध्ये स्त्रियांचा वापर करायला प्रथम त्याने सुरुवात केली. तो लहान मुलांना recruit करीत असे आणि सैनिकी प्रशिक्षण देत असे. सर्वसामान्य माणसांवर हल्ले करून त्यांना एकगठ्ठा मारणे वगैरे उद्योगही करीत असे. त्याच्या संघटनेला ब‑याच देशांनी अतिरेकी संघटना म्हणून घोषित केले आहे. हे त्याचे negative मुद्दे.

असा माणूस तहाची बोलणी खूपदा फिसकटल्यानंतर अंतिम युद्धात तुमच्या तावडीत सापडला तर तुम्ही काय कराल?

मध्ये काही news अशा वाचल्या की तो लष्करी रॉकेट हल्ल्यात ठार झाला असे जरी सांगितले गेले तरी प्रत्यक्षात त्याला वेगळ्या पद्धतीने मारले गेले असावे. काहींचे म्हणणे असे होते की त्याला अगदी जवळून गोळी घालण्यात आली. And here is the top spin: काही लोक म्हणतात की त्याला कैद केले गेले. त्याच्या मुलाला त्याच्यादेखत मारण्यात आले. आणि मग त्याला.

तुम्ही असे केले असते का?

आपल्या पुढच्या पिढीचा नाश बघणं ही अत्यंत भयानक आणि जीवनावरचा विश्वास उडवणारी गोष्ट म्हटली पहिजे. आपलं मुख्य कार्य असं म्हणतात की आपल्या genes पुढच्या पिढीला देणे. आणि स्वतःचं आणि आपल्या जवळच्यांचं पालनपोषण आणि रक्षण करणे. काही मासे मैलोनमैल पोहून प्रजननकालात एका ठराविक ठिकाणी जातात आणि मग नर मरतात. (आणि नर मरतात हे नरांना नाही निदान– आधीच्या पिढीतल्या -  मादीला तरी नक्की माहीत असणार.) तरीही प्रजननाचा force अधिक powerful ठरतो. काही कीटक माद्या अंडी घातल्यावर मरतात.

दुसरा प्रकार म्हणजे मधमाशांमधल्या सैनिक माशा असतात त्या चावतात तेव्हा विषारी काटा शत्रूच्या अंगात रुतवतात. तो काटा मधमाशीच्या शरीरापासून अलग होतो आणि मग ती माशी मरते.

हे दोन्ही डार्विनच्या भाषेत struggles for life म्हटले (तो concept याहून मोठा आहे) तरी यातला प्रजनन हा मोठा म्हटला पाहिजे. अर्थात हे त्या सैनिक मधमाशीला पटणार नाही. आपली सुहागरात सोडून युद्धवेदीवर चढलेले  जवान आपल्याला माहित असतातच.

यात तुमच्यासाठी दोन प्रश्न- पहिला म्हणजे तुमच्या जालीम शत्रूला तुम्ही कसे माराल? यात महत्वाचा मुद्दा हा आहे की शत्रूला आजिबात दयामाया दाखवता येणार नाही आहात अशा अस्तित्वाच्या लढ्यात वेळी तुम्ही किती ruthless व्हाल? तुम्ही अलेक्झांडर आणि तो पोरस किंवा तुम्ही राजे आणि तो कल्याणच्या सुभेदाराची सून नाही असं तात्पुरते म्हटले तर तुम्ही शत्रूला द्रौपदीपुत्रांना अश्वत्थाम्याने मारले तरे माराल, कर्णादिकांनी अभिमन्यूला मारले तसे माराल, विल्यम वॉलेससारखे माराल की शत्रूची खाल सोलून की शत्रूच्या पोटात बाघनखे खूपसून?

दुसरा प्रश्न असा आहे की प्रभाकरला नेमक्या कोणत्या पराभवाचे अपयश जास्त दुःखद वाटले असेल?

(Recommended reading –

Origin of Species by Charles Darwin.

दुर्गाबाई भागवतांनी – बहुधा ऋतूचक्र मध्ये – त्यांनी बघितलेल्या अंडी देत मरणा-या फुलपाखराच्या मादीचे वर्णन केले आहे. तसंच बोका आपल्या मोठ्या झालेल्या पिलावर फिदा आहे हे बघून त्याच बोक्यापासून झालेल्या आपल्या त्या पिलावर धावून जाणा-या मांजरीचेही वर्णन आहे त्यात. जरूर वाचा.)

समुद्र कट्टा… मिटता कमलदल

(Thanks to aathavanitli-gani)

पुणे. नळस्टॉपजवळचे समुद्र हॉटेल. शनिवार. वेळ सकाळी ९ च्या आसपास.

पुण्यामध्ये कट्टा संस्कृती तशी जुनी आहे. मोजक्या सुहृदांचे असे संघ सगळीकडे असतात. एखाद्या गावात तालमीजवळ, शाळेसमोरच्या ध्वजस्तंभाजवळ, पारावर असे घोळके जमलेले जसे मी पाहिलेत, तसेच शाळेच्या ग्राउंडवर, एखाद्या बागेतल्या बाकड्यांवर, कॅफे कॉफी डे अगर स्टारबक्सच्या खुर्च्यांवर regularly भरणा‑या शाळांमध्ये मीही कधीकधी हजेरी लावलीय.

कट्टाची संकल्पना माणसाला दुनियदारीची अक्कल येण्याअगोदरच येते. कट्टा हा regularly भेटणा‑या मित्रांचा समूह. रोज संध्याकाळी, आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा असे. मित्र सगळेच जिवलग असतात असेही नाही, पण ब‑याचदा तिथे individuals येत नाहीत. सुरवातीचा काही काळ गेला की मग हलवून घट्ट बसवलेल्या जात्याच्या दांड्यासारखा (ही उपमा कोणाची आहे?) तो ग्रुप बांधील होऊन जातो. मग तुमचं आणि एखाद्या मित्राचं फारसं पटत नसूनही दोनदोन वर्षे एकमेकांशी न बोलता तुम्ही कट्ट्यावर एकमेकांना भेटत असता.

कट्ट्यावर आपण जमतो, ते मुख्यतः गप्पा मारायला. सुखदुःखे वाटायला. आता वर्षानुवर्षे दर आठवड्यातून एकदा भेटून सांगण्यासारखी काय सुखदुःखे असणार? पण त्यापलीकडे तरी काय असतं सांगण्यासारखं तुमच्या-माझ्याजवळ? कट्टा जमतो, तुम्ही भेटता, नव्या मित्रांचा गुणाकार तर कधी जुन्यांची वजाबाकी होते. यात तसा अर्थ काही नाही. पण म्हणाल तर खूप आहे.

सगळेच कट्टे चांगले असतात असं कसं म्हणता येईल? म्हणजे पुलंनी रेखाटलेला बेळगावच्या थियटरच्या आवारातला रावसाहेबांचा कट्टा आणि पुण्यातल्या जोशी अभ्यंकर यांच्या मारेक‑यांचा कट्टा सारखेच कसे असतील?

कट्टा काही काळ टिकून राहतो तेव्हा तो जरा चांगला असल्यामुळे टिकत असावा. थिल्लर पोरांच्या कट्ट्याला पुण्यात कट्टा म्हणत नसावेत. चौकातली मंडळं आणि कट्टा हे सारखे नाहीत. एकतर वय वाढेल, तशी थिल्लर मुलंदेखील सुधारतात. (नाही सुधारली तर बहुधा politics मध्ये पुढा‑यांचे कार्यकर्ते बनून जगतात. J) दुसरं म्हणजे एकदा कट्टयाचा जरा नीट जम बसला, की कट्ट्याचं वातावरण बिघडवणा‑यांचं तिथे आजिबात स्वागत होत नाही.

याचा अर्थ कट्टा फक्त तरुणांचा असतो किंवा तिथे केवळ सात्विक वैचारिक देवाणघेवाण होते असा नाही. कट्ट्यावर लोक आपापली मतं मांडायला येत असतात. त्यात समूहाच्या मानसिकतेचे सर्व गुणदोष असतातच. ‘शनिवारी रात्री कात्रजचा ट्रेक’ किंवा ‘माळवाडीच्या पलीकडे कॉर्पोरेशनची जागा आहे तिथे २५ तारखेला झाडं लावायचं ठरलंय. गोपीनाथकाकांनी परमिशन घेतली आहे. त्यांच्या ऑफिसचे काही लोक, ते कॉलेजला होते त्यावेळचे त्यांचे मेसचे मित्र असे सगळेजण आहेत. प्रत्येकी पन्नास रुपये…’ अशा चर्चा जशा होतात तशाच ‘यावेळी आपलं पॅनेल आणू ग्रामपंचायतीवर’ किंवा ‘अरे थिएटरमध्ये गाणी म्हणू पिक्चर चांगला नसला तर’ असे संकल्प ठरतात आणि गाडीवरून उडून गेलेल्या एखाद्या पाखराकडे तितक्याच रुणझुणत्या नजरेने किंवा ‘पाखरू गेलं उडत’ अशा नजरेने पाहणा‑यांना लगेच ‘भौरा बडा नादान है’ चा आहेर देऊन असे काही संकल्प अंमलातही आणले जातात.

तिथे तुमच्या आनंदात सहभागी होणारे मित्र असतात. आणि माझं resume देतो, तुमच्या कंपनीत अकाउंट्स डिपार्ट्मेंटला ओपनिंग असेल तर पोस्ट कर, असं सांगणारेही मित्र असतात. तरुणांच्या कट्ट्यावरचे सगळेच शाळासोबती असतात असे नाही. ते कट्ट्याचं मोठं यश आहे. तिथे मित्रांचे मित्र येऊन तुमचे मित्र बनून जातात. बरं तिथली मैत्रीही तुमच्या ऑफिसमधल्या colleagues बरोबरच्या तुमच्या मैत्रीपेक्षा वेगळी असते. कट्टा खूपच diverse असतो. आणि तरीही तो टिकतो. इतकी sustainable diversity इतर ठिकाणी अभावाने सापडते. CA ची तयारी करणारे अभ्यासू, त्यांना मी direct taxes चा अभ्यास कसा केला होता हे सांगणारे गुरू, JVK, बाफना, दिक्षा यांचे चेले तिथे पान जमावे तसे जमून जातात. तालमीत जाणा‑या दांगटांची आणि काही अगदीच सॉफ्टवेअर असणा‑यांची मैत्री असते असते तिथे. कट्टा जसजसा वयाने वाढतो, तसतशी ही मैत्री बदलत जाते. (एकंदरीतच आपण वयाने वाढतो तसं आपण independent ही होत जातो. मैत्री अत्यंत महत्वाची आहे, पण खूप मित्र नाही सांभाळता येत आपल्याला, याची जाणीव होत जाते.)

समुद्र रेस्टॉरंट मध्ये शेजारचे दोनतीन टेबल रिजर्व केलेला असा एक ग्रुप बघितला नुकताच. पन्नाशीतला सुशिक्षित कट्टा. वयस्कर लोकांचे जे कट्टे असतात तिथे काय चर्चा होतात? काय विषय होतात त्यांचे? आपल्या वयाच्या कट्ट्यावर जसे बरेचसे निरर्थक विषय होतात तसेच त्यांचे विषय असतात का? नाही म्हटलं तरी दोन पिढ्यांमध्ये तसं बरंच अंतर असतं. असायलाच पाहिजे. आणि तरीही आपण सर्व एकच आयुष्य जगत असतो.

समुद्रातल्या कट्ट्याबद्दल बोलत होतो. वेळ शनिवार सकाळ. साधारणपणे १०-१२ जण. दोनतीन couples. (पन्नाशीतल्या काका काकूंना couple म्हणायला कसंतरीच वाटतं.) एका काकूंच्या डोक्याला रुमालाचा स्कार्फ. एक काका अर्धे टक्कल असलेले. दुसरे स्लिम आणि अर्धवट पांढरी दाढी असलेले. दुस‑या एक काकू गव्हाळ ते गोमट्या; भु‑या डोळ्यांच्या. त्या ज्या energy ने बोलताहेत ती कट्ट्याला जान आणणारी energy प्रत्यक्ष बघितली नाही तर नुसत्या appearance वरून अशक्त वाटाव्यात इतके ते भुरे डोळे आणि रंगाचे combination खतरनाक. एकंदरीत तुम्ही सहज imagine करू शकाल असा हा ग्रुप. या ग्रुपबद्दल काही विषेश आहे का? नाही.

मुलं, नातवंडं अमेरिकेत आहेत, असे हे लोक असावेत. पुढचे संवाद काही जसेच्या तसे, काही imaginary. जे imaginary आहेत तिथे मूळ संवादांचा मूड पकडण्याचा प्रयत्न केलाय.

‘सॅन दिएगोला जाऊन मस्त खेळणार दीड महिना’,

‘दुडूदुडू की उछलकूद?’

‘मध्या, त्याची मधी, मी आणि माझा बाबा ट्रेकला निघालोय. त्यामुळे यावर्षी winter मध्ये…’,

‘ए काढ रे तो मास्क. आम्ही सगळे तुला मुहदिखायीचा तोफा देऊ.’,

‘तुला तोहफ़ा म्हणायचंय ना. मला वाटलंच तू हिंदीची चिंधी केली असणार’

‘फुल्या फुल्या फुल्या’

पुलंच्या हिंदीच्या चिंधीला प्रत्त्युत्तर म्हणून पुलंच्याच फुल्या फुल्या आल्यावर मी तुडूंब प्रसन्न.

‘टाळी दे’

‘फुल्या फुल्या फुल्या म्हटलंना’

‘Bay area त वेदर मस्त असतो’

‘अब झलकतें हुए सागर नही देखें जातें’

‘फुल्या फुल्या फुल्या. फुल्या फुल्या फुल्या’

‘ऐकलीयस का बेगम अख्तर? हमने देखा ज़मानें का बदलना लेकिन उनके बदले हुए तेवर नही देखें जातें. अब झलकतें हुए सागर नही देखें जातें’

‘नायगरा बघा.’

‘मी देतो तुला cd.’

‘मला नाही कळत त्यातलं. पण आण.’

वय वाढत गेले की आपल्याला ब‑याच गोष्टींचा लळा लागत असावा. त्यासाठी पुरेसा वेळही मिळत असेल. किंवा कदाचित वेळ भरून काढण्यासाठी या गोष्टींचा उपयोग होत असेल.

‘ही इथे अशा गोष्टी शेअर करायची आयडिया माझी. प्रत्येक  transaction ची दहा रुपये रॉयल्टी ठरवायला पाहिजे होती आधीच.’

‘माफ करा मिस्टर. पण ही आयडिया अविनाशची होती.’

‘अव्याचा जन्म तरी झाला होता का तेव्हा? तो दोनतीन वर्षांनी यायला लागला कट्ट्यावर.’

‘घेई छंद मकरंद. घेई छंद मकरंद.’ वसंतरावांचे. (जितेंद्र अभिषेकींचे नाही.)

‘अग ऐक. अव्या तर तुमच्याही मागाहून यायला लागला. मी- ’

‘प्रिय हा मिलिंद. मधुसेवनानंद…’

‘मी आणि शिशिरने चालू केला हा कट्टा.’

‘मिटतां कमलदल, कमलदल. मिटतां कमलदल. होई बंदी भृंग. तरि सोडिना ध्यास. गुंजनात दंग. घेई छंद मकरंद.’

मिटता कमलदल!

मनासारखा न झाल्याने हे पोस्ट मी पुढेमागे परत लिहीन असा आता विचार आहे.

To Kill A Mockingbird

मी पहिल्यांदा जेव्हा To Kill A Mockingbird हे पुस्तक वाचलं, त्याच वेळी ते मला खूप आवडलं. आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा त्या पुस्तकातलं काहीतरी description आठवलं तेव्हा तेव्हा मला ते पुस्तक परत वाचावं असं अगदी मनापासून वाटायचं. पण मी मुद्दाम ते पुस्तक वाचायला नाही घ्यायचो. अगदी पुस्तक हातात घेऊन परत ठेवायचो.

खूप साधं पुस्तक आहे ते. एक माणूस आणि त्याची दोन मुले. लहानशा मुलीच्या निवेदनामधून उलगडत जाणारी कथा. पण हे पुस्तक वाचल्यानंतर आपण Scout, Jem and Atticus यांना कधी विसरूच शकणार नाही. इतकी ती characters पक्की आणि प्युअर. Atticus Finch हा तर एक आदर्श नायक आहे.

एकदोन अतिआवडते भाग -

Atticus said to Jem one day, “I’d rather you shot at tin cans in the back yard, but I know you’ll go after birds. Shoot all the bluejays you want, if you can hit ‘em, but remember it’s a sin to kill a mockingbird.”

That was the only time I ever heard Atticus say it was a sin to do something.

And a discussion between Scout and Atticus –

“Atticus, you must be wrong…”

“How’s that?”

“Well, most folks seem to think they’re right and you’re wrong…”

“They’re certainly entitled to think that, and they’re entitled to full respect for their opinions,” said Atticus, “but before I can live with other folks I’ve got to live with myself. The one thing that doesn’t abide by majority rule is a person’s conscience.”

या पुस्तकाबद्दल जास्त बोलण्यात काही point नाही. पण one of the few books I would want everyone to read.

या पुस्तकाला पुलित्झर पारितोषिक मिळाले. पिक्चरही एकदम छान. ग्रेगरी पेकने रंगवलेला Atticus Finch तर आजही most heroic characters च्या polls मध्ये टॉपला असतो. तो खरंच चांगला केलाय त्याने. एकंदरीतच पुस्तकांवर आधारित पिक्चर लोकप्रिय होतात. अर्थात पिक्चरपेक्षा पुस्तक जवळजवळ नेहमीच चांगले असते. त्यामुळे मला पिक्चरपेक्षा पुस्तक जास्त आवडले यात नवल काही नाही. पण असं आहे की आता जेव्हा मी पुस्तक ब‑याच काळानंतर वाचायला घेतलंय, मला पुस्तक वाचताना ग्रेगरी पेकच नजरेसमोर येतो. अर्थात Rhett Butler वाचताना क्लार्क गेबलच समोर असतो, त्यामुळे यात तसे नवं काही नाही. असो.

तर मी खूप दिवस दिवस टाळाटाळ करत परत एकदा ते पुस्तक वाचायला घेतलंय. मी नवं पुस्तक वाचण्यापेक्षा आवडलेलं पुस्तक परत परत वाचणा‑यांपैकी. त्यामुळे ही टाळाटाळ तशी नवी. बरं त्यात हे पुस्तक खूपच जास्त आवडलेलं. मग परत का नव्हतो वाचत? याचं कारण साधेपणा आणि स्काउट. ही ६-७ वर्षांची मुलगी मनात कुठंतरी घर करून बसली आहे. हे पिल्लू दूर व्हायलाच तयार नाही! आणि साधेपणा हे कारण का हे सांगून नाही समजणार. त्यासाठी पुस्तकच वाचलं पाहिजे. हे पुस्तक कशाबद्दल आहे? जुनी शांत जीवनशैली? कोर्टकेस? एक आदर्श बाप आणि माणूस? No. It has all this but then ultimately it is just a simple story of growing up.

मग परत का वाचायला घेतलं? मध्ये सलमान रश्दीचं मिडनाईट्स चिल्ड्रन वाचलं. एकदम आवडलं. पण त्यात ही स्काउट परत समोर आली. सलीम ची बहीण बनून – Brass monkey. ते पुस्तक वाचून झाल्यावर परत सुरुवातीपासून वाचायला घ्यावं का असा विचार होता. त्यात monkey चे character त्याने मुद्दाम पूर्ण develop केले नाही. पण तेही खूप आवडलं. ते पुस्तक खूपच creative आहे. पण monkey  चे character अगदी उचललेलं. आणि मग नेटवर कुठंतरी वाचलं की रश्दीच्या ब‑याच पुस्तकांत Scout वेगवेगळी characters बनून येते. मग मात्र राहवेना. :)

मी फूल तृणांतिल इवलें

One of my favorite poems:

मी फूल तृणांतिल इवलें

जरि तुझिया सामर्थ्यानें
ढळतील दिशाही दाही
मी फूल तृणांतिल इवलें
उमलणार तरिही नाहीं

शक्तीने तुझिया दिपुनी
तुज करितिल सारे मुजरे
पण सांग कसे उमलावें
ओठांतिल गाणॆ हसरें ?

जिंकील मला दवबिंदू
जिंकील तॄणाचें पातें
अन स्वत:स विसरून वारा
जोडील रेशमी नातें

कुरवाळीत येतिल मजला
श्रावणांतल्या जलधारा
सळसळून भिजलीं पानें
मज करितिल सजल इषारा

रे तुझिया सामर्थ्यानें
मीं कसें मला विसरावें ?
अन रंगांचे गंधांचें
मीं गीत कसें गुंफावें ?

येशिल का सांग पहाटॆ
किरणांच्या छेडित तारा :
उधळीत स्वरांतुन भवतीं
हळु सोनेरी अभिसारा ?

शोधीत धुक्यांतुन मजला
दवबिंदू होऊनि ये तूं
कधिं भिजलेल्या मातीचा
मॄदु सजल सुगंधित हेतू !

तूं तुलाच विसरून यावें
मीं तुझ्यांत मज विसरावें
तूं हसत मला फुलवावें
मीं नकळत आणि फुलावें

पण तुझिया सामर्थ्यानें
ढळतील दिशाही दाही
मी फूल तृणांतिल इवलें
उमलणार तरिही नाहीं

कवी: मंगेश पाडगांवकर

कवितासंग्रह: जिप्सी

पुण्यातला पाऊस

एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का की तसा ब-यापैकी पाऊस होऊनही, दोनतीन वळवाचे (जूनमधल्या पावसाला पण वळवाचाच म्हणूया या वर्षी) पाऊस सोडले तर पुण्यात यंदा अजूनतरी ढगांचा गडगडाट आणि विजांचा लखलखाट यांच्यासह पाऊस कोसळला नाही.