समजा, तुम्ही एका अत्यंत कडव्या शत्रूशी लढत आहात. तुम्हा दोघांच्या सैन्यांमध्ये कधीही तह वगैरे आजिबात संभवत नाही. तू किंवा मी आणि विजय किंवा मरण असे द्वंद्वयुद्ध. अशा वेळी लढाईत तुम्ही वरचढ चढलात आणि तुमचा तो शत्रू आपल्या उरल्यासुरल्या सैन्यासह, कुटुंबियांसह तुम्हाला शरण आला तर तुम्ही काय कराल?
Situation आणखी clear करण्यासाठी आपण असे म्हणूया की तुमच्या आणि त्या शत्रूच्या value system मध्ये काहीही middle ground नाहीये. (असं कधी नसतं पण मध्ये बराच काळ गेला की अशी परिस्थिती येऊ शकते.) तुमच्या histories, संस्कृती, आणि भविष्याच्या visions अत्यंत वेगवेगळ्या – विरुद्ध – आहेत, असं तुम्हा दोघांनाही जाणवलं आहे. त्यामुळे एकतर तुमचं किंवा त्याचं अस्तित्व असणं शक्य आहे. दोघे एका वेळी गुण्या आणि गोविंदासारखे राहणे शक्यच नाही. अशा वेळी तो तुमच्या तावडीत सापडला तर तुम्ही काय कराल?
आणखी ब‑याच complications टाळण्यासाठी असं समजा की हा शत्रू एखादा देश वगैरे नसून एक माणूस आहे. आणि तो काही सैनिक आणि आईवडिल मुलबाळं यांच्यासह तुम्हाला शरण आला आहे.
थोडा विचार केला तर आपल्या असं लक्षात तो शरण येणं किंवा तावडीत सापडणं यामुळे अशा वेळी काही फरक नाही. तो किंवा तुम्ही अशा द्वंद्वात तुम्ही, कसेका होईना, वरचढ ठरलांत तर तुम्ही त्याला मारण्यापलीकडे काही पर्याय नसतो.
प्रभाकर आणि त्याच्या संघटनेचा तिथल्या लष्कराने शेवटी नायनाट केला. (त्याचे तेच नाव बरोबर आहे. उद्या तुम्ही मला ह्रूत्विक या नावाचा अपभ्रंशित वापर केल्याने एखादा हिरो हिट झाला असे सांगितले तरी मी ते मान्य थोडेच करणार आहे? अशी नावे कधी असतात तरी का! असो.)
आता इथे युद्धात चांगली आणि वाईट अशा बाजू असतात का असा विचार बाजूला ठेवू. कारण मला त्यांच्या ideologies बद्दल माहितीही नाही आणि उगीच comments करायची इच्छाही नाही. तो गेला तेव्हा २५ हून अधिक वर्षे चालवलेला लढा तो हरला असे म्हणूया. (अर्थात त्याचे success चे निष्कर्ष वेगळे असतील. उदा.- माझ्या माणसांना मान मिळवून दिला, वगैरे वगैरे.)
आपल्या वंशाच्या लोकांसाठी चालवलेल्या लढ्यात तिथल्या लष्कराला त्याने बराच काळ त्रस्त करून सोडले होते. त्याने आत्मघातकी बॉम्बहल्ले पहिल्यांदा सुरू केले. हल्ल्यांमध्ये स्त्रियांचा वापर करायला प्रथम त्याने सुरुवात केली. तो लहान मुलांना recruit करीत असे आणि सैनिकी प्रशिक्षण देत असे. सर्वसामान्य माणसांवर हल्ले करून त्यांना एकगठ्ठा मारणे वगैरे उद्योगही करीत असे. त्याच्या संघटनेला ब‑याच देशांनी अतिरेकी संघटना म्हणून घोषित केले आहे. हे त्याचे negative मुद्दे.
असा माणूस तहाची बोलणी खूपदा फिसकटल्यानंतर अंतिम युद्धात तुमच्या तावडीत सापडला तर तुम्ही काय कराल?
मध्ये काही news अशा वाचल्या की तो लष्करी रॉकेट हल्ल्यात ठार झाला असे जरी सांगितले गेले तरी प्रत्यक्षात त्याला वेगळ्या पद्धतीने मारले गेले असावे. काहींचे म्हणणे असे होते की त्याला अगदी जवळून गोळी घालण्यात आली. And here is the top spin: काही लोक म्हणतात की त्याला कैद केले गेले. त्याच्या मुलाला त्याच्यादेखत मारण्यात आले. आणि मग त्याला.
तुम्ही असे केले असते का?
आपल्या पुढच्या पिढीचा नाश बघणं ही अत्यंत भयानक आणि जीवनावरचा विश्वास उडवणारी गोष्ट म्हटली पहिजे. आपलं मुख्य कार्य असं म्हणतात की आपल्या genes पुढच्या पिढीला देणे. आणि स्वतःचं आणि आपल्या जवळच्यांचं पालनपोषण आणि रक्षण करणे. काही मासे मैलोनमैल पोहून प्रजननकालात एका ठराविक ठिकाणी जातात आणि मग नर मरतात. (आणि नर मरतात हे नरांना नाही निदान– आधीच्या पिढीतल्या - मादीला तरी नक्की माहीत असणार.) तरीही प्रजननाचा force अधिक powerful ठरतो. काही कीटक माद्या अंडी घातल्यावर मरतात.
दुसरा प्रकार म्हणजे मधमाशांमधल्या सैनिक माशा असतात त्या चावतात तेव्हा विषारी काटा शत्रूच्या अंगात रुतवतात. तो काटा मधमाशीच्या शरीरापासून अलग होतो आणि मग ती माशी मरते.
हे दोन्ही डार्विनच्या भाषेत struggles for life म्हटले (तो concept याहून मोठा आहे) तरी यातला प्रजनन हा मोठा म्हटला पाहिजे. अर्थात हे त्या सैनिक मधमाशीला पटणार नाही. आपली सुहागरात सोडून युद्धवेदीवर चढलेले जवान आपल्याला माहित असतातच.
यात तुमच्यासाठी दोन प्रश्न- पहिला म्हणजे तुमच्या जालीम शत्रूला तुम्ही कसे माराल? यात महत्वाचा मुद्दा हा आहे की शत्रूला आजिबात दयामाया दाखवता येणार नाही आहात अशा अस्तित्वाच्या लढ्यात वेळी तुम्ही किती ruthless व्हाल? तुम्ही अलेक्झांडर आणि तो पोरस किंवा तुम्ही राजे आणि तो कल्याणच्या सुभेदाराची सून नाही असं तात्पुरते म्हटले तर तुम्ही शत्रूला द्रौपदीपुत्रांना अश्वत्थाम्याने मारले तरे माराल, कर्णादिकांनी अभिमन्यूला मारले तसे माराल, विल्यम वॉलेससारखे माराल की शत्रूची खाल सोलून की शत्रूच्या पोटात बाघनखे खूपसून?
दुसरा प्रश्न असा आहे की प्रभाकरला नेमक्या कोणत्या पराभवाचे अपयश जास्त दुःखद वाटले असेल?
(Recommended reading –
Origin of Species by Charles Darwin.
दुर्गाबाई भागवतांनी – बहुधा ऋतूचक्र मध्ये – त्यांनी बघितलेल्या अंडी देत मरणा-या फुलपाखराच्या मादीचे वर्णन केले आहे. तसंच बोका आपल्या मोठ्या झालेल्या पिलावर फिदा आहे हे बघून त्याच बोक्यापासून झालेल्या आपल्या त्या पिलावर धावून जाणा-या मांजरीचेही वर्णन आहे त्यात. जरूर वाचा.)